Friday, November 18, 2011

बोलायाला निवांत काही...

आज सहजच डायरी उघडली आणि नेमकी ही कविता समोर. २ वर्षांपूर्वी वाचलेली. आवडली म्हणून लिहून ठेवलेली. आणखीही चार जणांनी वाचावी म्हणून इथे टंकवतोय. इंदिरा संतांची मला अत्यंत आवडणारी ही कविता.. एवढ्या सहजपणे एखादा प्रसंग कवितेत कसा सांगू शकतं कोणी याचं आश्चर्य वाटतं. असो.

हे वरचं वाचलं नसतं तरी चाललं असतं!


बोलायाला निवांत काही
हॉटेलामधि शिरलो आपण
आणिक कुठल्या उत्साहाने
मागविलेही पदार्थ खच्चुन.

बोलावे तो – तशी नेमकी
जाणीव झाली कशी विसंगत :
नव्हते काहीच बोलायाला;
डोळे होते डोळा चुकवित.

न्याहाळत मी जपानी तरुणी;
तूंहि काढली नोट खिशातुन;
अर्धा कपही चहा न सरला;
निमुटपणाने उठलो तेथून !

नकळत वळली दूर पावलें
कशांतून तरि सुटलो वाटुनि;
नकळत वळले बाजुस डोळे
परतायाची ओढ लागुनी !

------- इंदिरा संत.
(काव्यसंग्रह – शेला)

0 comments:

Post a Comment

Search This Blog

 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!