तीन वर्षांपूर्वी ब्लॉगरावर खातं उघडलेलं. बी.इ.चा प्रोजेक्टच होता तो माझा म्हणून. म्हणजे ब्लॉग आज्ञावली बनवण्याचा.(आज्ञावली हा शब्द वी.जे.टी.आय.चे उपकार) तर नंतर विजयादशमीच्या मुहूर्तावर मी आणि विक्रमने ब्लॉग लिहिण्यास सुरूवात करायचं ठरवलेलं, त्याने लिहिलं आणि मी आपल्या स्वभावास जागून काहीही लिहिलं नाही. तर हे स्वाभाविकच होतं. आज सकाळीच त्याचा ब्लॉग वाचत बसलेलो तर म्हटलं लिहावंच काहीतरी. म्हणून हे खरडणं.
मलाही थोडंफार कळतं हे सांगण्याचा अट्टाहास म्हणून.. म्हणूनच कदाचित.. हे लिहितोय. पण त्याहीपेक्षा जे काही थोडेफार, तोकडे का होईना, पण आलेले अनुभव ,हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकी वाचलेली पुस्तकं, भेटलेली-पाहिलेली-ओळखीची-अनोळखी माणसं, प्रसंग या साऱ्यातून जे शिकता आलं, जगता आलं त्यातून स्वाभाविकपणे जे सुचलं, उमटलं ते मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न. प्रामाणिक!
जरूर भेट द्या.. ..ब्लॉगला! प्रतिक्रियांचे स्वागत आहे. (हे वाक्य त्याच्या ब्लॉगवरूनच copy-paste केलंय!) चांगल्या प्रतिक्रियांचे जास्त स्वागत आहे. कारण मला कौतुक करून घ्यायला प्रचंड आवडतं. तर हे फारच झालं! असो.
0 comments:
Post a Comment